Translate

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी ' RTGS 'ला देखील डिसेंबरपासून २४ तास उपलब्ध केले आहे. RTGS हि संकल्पना आपल्यासाठी नवीन असू शकते. आपण हे इतके समजू घ्या कि  RTGS हि संकल्पना  ऑनलाईन मनी ट्रान्सफरशी संबंधित आहे. तसे ऑनलाईन मनी ट्रान्सफरसाठी NEFT, RTGS, IMPS तसेच UPI पद्धत राहते.यामध्ये फोन पे गूगल पे चे व्यवहार UPI मार्फत होत असतात. 



१६ डिसेंबर २०१९ रोजी NEFT ची सुविधा २४ तास उपलब्ध करण्यात आली त्यावेळेस आपण NEFT आणि UPI बद्धल व्यवस्तीत सजून घेतले होते.तशी RTGS म्हणजे  Real Time Gross Settlement ची सुविधा  2 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित करताना सुद्धा वापरली जाते. 

यामध्ये पैसे पाठवण्याची कमाल मर्यादा नाही मात्र १० लाखांपर्यंतची रक्कम हस्तांतर करण्यास सहज परवानगी असते. तसेच यामध्ये आपण नेटबॅंकिंग करत असाल तर बॅंकेत न जाता ग्राहक आरटीजीएस द्वारे मोठी रक्कम हस्तांतरित करू शकता - ज्यावेळी UPI ने म्हणजे फोन पे गूगल सारख्या apps ने पेमेंट करताना अनेक मर्यादा येतात - अशा वेळी NEFT आणि RTGS चा मोठा वापर होतो.मात्र सध्या 'RTGS 'च्या माध्यमातून ग्राहकाला सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत व्यवहार करता येतात.त्यामुळे रात्री आपले मोठे व्यवहार होत नाहीत. मात्र आता रिझर्व्ह बँकने केलेल्या घोषणे नंतर RTGS ची सुविधा सुद्धा १ डिसेंबर २०२० पासून २४ तास उपलब्ध राहणार आहे.ज्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान रिझर्व्ह बँकने दिलेली हि माहिती आणि हे नॉलेज अपडेट प्रयेक नागरिकांसाठी खरोखर खूप महत्वाचे आहे - आपण इतरांना देखील शेअर करा 


योग्य पिन टाकूनही एटीएममधून पैसे न आल्यास
जर योग्य पिन टाकूनही एटीएममधून पैसे न आल्यास काय करावे रिजर्व बँकेने दिली महत्वाची माहिती दीली बर्याच वेळेस आपण एटीएममध्ये योग्य पिन टाकतो तसेच सर्व प्रक्रीया करतो पण तरीही पैसे बाहेर येत नाही मात्र पैसे गेल्याचा मेसेज मोबाईलमध्ये येतो अशा वेळेस नेमकं काय करायला पाहजे हा प्रश्न प्रत्येकाला पडणारच  या प्रश्नाचे उत्तर देताना काल रिजर्व बँकेने खूप महत्वाची माहिती दिली आहे .



रिजर्व बँकेने या प्रश्नाचे उत्तर काल आपल्या अधिकृत वेबसाईट वर दिले आहे.जर योग्य पिन टाकूनही एटीएममधून पैसे आले नाहीत. तर ग्राहकाला त्याचे पैसे बॅंकेला परत करावे लागतील असे स्पस्ट केले आहे,रिजर्व बँके ऑफ इंडिया ने सांगितले. पैसे कमी आले असतील किंवा आले नसतील व एटीएम दुसऱ्या बॅंकेचे असेल तर ग्राहकांनी आपल्या बॅंकेत तात्काळ तक्रार करणे गरजेचे आहे. यानुसार ट्रान्झाक्शन अयशस्वी झाल्यास ५ दिवसांच्या आत बॅंकेने ते पैसे ग्राहकाच्या अकाऊंटमध्ये क्रेडीट करणे आवश्यक आहे. यामध्ये बॅंकेने ५ दिवसात पैसे परत न केल्यास दररोज शंभर रुपयाप्रमाणे बॅंकेले पैसे द्यावे लागतील. बॅंकेला प्रश्न करुनही ३० दिवसांच्या आत उत्तर न मिळाल्यास ग्राहक बॅंकीग लोकपालकडे पुन्हा जाऊन तक्रार करू शकतो,असे रिजर्व बँके ऑफ इंडियाने काल स्पष्ट केले आहे.  

   *दरम्यान आता रिजर्व बँकेने दिलेली* हि माहिती प्रत्येक नागरिकांसाठी खरोखर खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा 



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने